लातूर (ऋषी होळीकर): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर हल्ला चढवला आहे. लातूर येथे बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत पण त्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या मागे येऊ कारण तुम्ही एवढे दिवस सत्तेत राहिले आहेत आणि मराठा आरक्षण प्रश्न हा सर्व पक्षाच्या बैठकीतून सोडविता आला असता पण सगळे विरोधी पक्ष हे गैरहजर राहिले यावर काय समजायचे, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत पण त्यांच्या काळात मराठा आरक्षणाचा 'म' सुद्धा त्यांनी उच्चारला नाही. यामुळे शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये येऊन हा प्रश्न सोडवावा, असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. शरद पवार हे बाहेर एक बोलतात आणि आत मध्ये एक बोलतात. यामुळे पवार साहेबांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-07-27T13:40:28Z dg43tfdfdgfd