MUMBAI CRIME: कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या वस्तू जप्त

Gold Sized at Mumbai Airport: सीमाशुल्क विभागाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. सीमा शुल्क विभागाने एका पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीत विमानतळावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल ते 2 मे या काळात 15 भारतीय नागरिकांना दुबई, मस्कत, अबू धाबी, बहरीन आणि जेद्दाह या विमानतळावरुन परतत असताना भारतात सोने आणताना पकडले आहे. काहींनी हे सोने जीन्सच्या खिशात लपवून ठेवले होते तर काहींनी बॅगेज ट्रॉलीच्या टोपलीत तपवले होते. काहींच्या अंगावर हे सोने होते तर काही प्रवाशांनी अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवले असल्याची माहिकी सीमाशुल्क विभागाने दिली आहे.

सोने तस्करीच्या या प्रकरणामध्ये विमानतळावरील एका कर्मचाऱ्याचाही समावेश होता. त्याला CISF अडवले आणि कस्टम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. या कर्मचाऱ्याती झडती घेण्याक आली तेव्हा त्याच्या पाण्याच्या बाटलीत 2.58 किलो वजनाची सोन्याची पूड लपवून ठेवलेली आढळून आली. हे सोने अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

अशाच आणखी एका प्रकरणात, दुबईहून भारतात परतणाऱ्या चार भारतीय नागरिकांनी अंतर्वस्त्रांमध्ये आणि प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवले होते. या चौघांकडून 3.335 किलो सोने जप्त करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच विमानाच्या सीटच्या खाली असलेल्या पाईपमधून 1.5 किलो वजनाच्या सहा सोन्याच्या पट्ट्याही जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या कारवाईत दुबईला जाणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला रोखण्यात आले, जेव्हा तो 14.21 लाख रुपये किमतीचे 9 आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जात असल्याचे आढळले. त्याने हातातील बॅगमध्ये आणि चेक-इन लगेजमध्ये या वस्तू लपवल्या होत्या. या वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची प्रकरणे सतत समोर ये असल्याने सीमाशुल्क विभागाकडून सामानाची कसून तपासणी केली जात आहे.

दरम्यान, 2022-23 मध्ये, सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील विविध भागातून जवळपास 4,000 किलो सोने जप्त केले होते, तसेच शेकडो प्रवाशांना अटक करण्यात आली होती. सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सतत अशी कारवाई करत असतात. या कारवाईनंतरही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि केरळमधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सोन्याच्या तस्करीची समस्या कायम आहे.

2024-05-07T07:16:02Z dg43tfdfdgfd