ONION EXPORT BAN: कांदा निर्यात बंदी मागे; निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

शुभम बोडके, नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत येतोय. निर्यात बंदी त्यासोबतच कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र भाजपच्या उमेदवारांना घेरण्याचा प्रयत्नही केला. मात्र आज केंद्र सरकारने सहा देशात कांदा निर्यात करण्याची परवानगी दिल्यानंतर आता संपूर्ण देशांसाठी कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीच्या काळात कांदा निर्यात बंदी मागे

निवडणुकीच्या काळातील केंद्र सरकारचा हा कांदा उत्पादकांसाठी सलग दुसरा मोठा निर्णय आहे, त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील महायुतीचे नेते प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत होतं. आता या संदर्भात केंद्राने देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी बघता मोठा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

डॉ भारती पवार यांनी मानले आभारनाशिक मधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण मतदार संघ आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असून आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ही लासलगाव येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, यंदा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांना प्रचार करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी अडचण निर्माण करत होते त्यामुळे सलग एक महिना उलटून देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या मतदारसंघात प्रचारासाठी फारशा दिसल्या नाही. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष बघता या निर्णयामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले.

सर्व देशात कांदा निर्यात खुली केल्यानंतर आता तातडीने केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी पत्रकार परिषद घेतली. निर्यात बंदी उठवल्यामुळे केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील भारती पवारांनी आभार मानले. निर्यात खुली झाली असून हा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असल्याचं भारती बाबा यांनी म्हटले. राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी प्रयत्न केले असून केंद्राने अखेर हा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्यास देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटले.

५५० डॉलर मॅट्रिक टन कांद्याचे किमान मूल्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि किमान मूल्याच्या आज कांदा खरेदी करता येणार नाही साधारणपणे कांद्याला प्रति किलो ४६ रुपये इतका भाव मिळणार आहे अशी माहिती देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली.

कांदा निर्यात बंदी मागे

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मनधरणी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सलग दुसरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्यामुळे आता या निर्णयाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न असल्यास देखील विरुद्धकांकडून बोललं जात आहे. त्यामुळे आता कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या तोंडावर पेटणार अशी परिस्थिती आता निर्माण झाली असल्याचं पहायला मिळत आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-04T06:10:14Z dg43tfdfdgfd