Trending:


Arvind Kejriwal Speech BKC MVA :जेलमध्ये इन्सुलिन दिलं नाही, CCTV लावले,ठाकरेंसमोर केजरीवालांचं भाषण

मुंबई : दिल्लीतील लोकांसाठी मी अनेक रुग्णालयं निर्माण केली, मोफत उपचार दिले, पण जेलमध्ये टाकल्यानंतर मोदींनी मला इन्सुलिनचे औषधही दिलं नाही असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 4 जून रोजी मी जेलमध्ये असणार आहे, तिथून देशाचा निकाल पाहणार, त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर मोदींनी नाकारलं पाहिजे असंही अरविंद केजरीवाल यांनी आवाहन केलं. अरविंद केजरीवाल हे महाविकास आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेला संबोधित करत होते. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे थेट तुरुंगातून तुमच्याकडून आलोय, जेलचे उत्तर व्होटने द्यायचे. मी झोळी पसरवून तुमच्याकडे भीक मागायला आलोय या देशायाला वाचवायला. हे देश आणि लोकशाही संपवण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. दिल्लीमध्ये 70 मधील 67 जागा 'आप'ला मिळाल्या होत्या. नंतर 62 मिळाल्याआणि भाजला 8 जागा मिळाल्या. 'आप'ला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्याने खोटे गुन्हे दाखल करून सिसोदिया, मला अटक केली. त्यांना वाटल मी राजीनामा देईन मी तुरुंगातून राज्य चालवताचा निर्णय घेतला. लोकशाहीला जर ते तुरुंगात टाकत असतील तर आन्ही तुरुंगातून राज्य चालवू. मी दिल्लीतील गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला अटक केली. तुमच्या मनाचा मोठेपणा यात होता की मी जर शेकडो शाळा काढल्या तर तुम्ही हजारो शाळा काढायला पाहिजे होतात. मी शेकडो हास्पिटल काढले, पण पंधरा दिवस तुरुंगात असताना माझे औषध मोदींनी बंद केले. माझं शुगर तीनशे पर्यंत गेलं, पण मला इन्सुलिन दिलं नाही. इन्सुलिन मिळालं नाही तर किडनी खराब होते. मला माहिती नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचे होते. मी दिल्लीत वीज बिल फ्री केलं, तुम्ही देशभरात हे करायला हवे होते. पण तुम्ही मला अटक केली . मी 2 जूनला पुन्हा तुरुंगात जाईन असं ते म्हणतायत, आता हे तुम्ही ठरवायचं आहे. मोदींना मत दिले की मी तुरुंगात जाईन आणि इंडियाला दिले की मी आझाद राहीन. रशियामध्ये विरोधकांना अटक केली आणि मोठ्या प्रमाणात पुतीनला मतं मिळाली. मोदींना भारताला बांगलादेश आणि पाकिस्तान करायचे आहे. निवडणुकीच्या एक महिना पूर्वी काँग्रेसचे अकाउंट सील केले. आता आमचे अकाउंट सील करण्याची तयारी सुरू केलीय. तुमच्यामध्ये दम असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा. वन नेशन वन लीडरसाठी मोदी काम करत आहेत. त्यासाठी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. जर मोदी यामध्ये जिंकले तर उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी हे सगळे तुरुंगात असतील.


बीडमध्ये कोट्यवधीची योजना तरी पाणीबाणी

Beeb water issue news


PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित

PDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबित पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सोमवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्याचा रोहित पवारांनी केला होता आरोप.


Loksabha Election : संजय राऊत यांची Uncut मुलाखत

Loksabha Election : Uncut


मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करताना…

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे जिकिरीचे काम टाळण्यासाठी काही महाभाग कसोशीने प्रयत्नशील असतात. या प्रक्रियेतून सुटका करून घेण्याचा मोह मला कधीच झाला नाही...


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचाऱ्यांची होणार बंपर भरती

Railway Recruitment 2024 : अनेक जण रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत असतात. रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटची सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने एईसीआर अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. या पदांवर नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणारे उमेदवार अर्ज करू...


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजितदादा दोषी नाहीत

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कोण राहणार वरचढ? मिहीर कोटेचा की संजय दिना पाटील ईशान्य मुंबईत कोण बाजी मारणार ? मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने? ईशान्य मुंबईत कमळ फुलणार की मशाल पेटणार? भाजपा आपला ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला राखणार की ठाकरेंचा उमेदवार भाजपचा बालेकिल्ला खेचून आणणार.. मुलुंड ते घाटकोपर मतदारांचा कौल ईशान्य मुंबईत कोणाच्या बाजूने? तिकडे उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार रस्सीखेच आहे.. ईशान्य मुंबईत भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील रिंगणात आहेत.. उत्तर मुंबईत भाजपकडून पियूष गोयल यांना तिकीट देण्यात आलंय.. गोयल यांच्याविरोधात काँग्रेसनं भूषण पाटील यांना रिंगणात उतरवलंय.. उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याविरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे


Sharmila Thackeray : बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला... राज ठाकरेंच्या भाषणावर शर्मिलांची प्रतिक्रिया

Sharmila Thackeray : बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती, की मला जर काँग्रेससोबत जायला लागलं, तर मी माझा पक्ष बंद करेन, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या


BJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP Majha

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला. हे ही वाचा मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या! Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


India GDP Growth: अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची बातमी, UN ने आर्थिक विकासदराचा अंदाज बदलला

UN on India Economic Growth: भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून जगभरातील रेटिंग एजन्सी चकित झाल्या आहेत. जगभरातील अर्थव्यवस्था आर्थिक आघाडीवर संघर्ष करत असताना भारतीय इकॉनॉमी मात्र सुस्साट वेगाने अग्रेसर आहे. अलीकडेच IMF आणि जागतिक बँकेने भारताच्या वाढीबाबत सकारात्मक रेटिंग दिले तर आता भारताचा वेग आम्ही विचार केला होता त्यापेक्षा अधिक वेगवान असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.


ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य ((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण मात्र गुलदस्त्यातच ((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर ((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.


पक्ष्यांचे जीवनमान बदलतेय!

भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये जंगलांत आगी लागण्याच्या 342 घटना देशभरात घडल्या. याचा फटका पक्ष्यांना बसला आहे. याचे कारण मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. गेल्या काही वर्षांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे जीवनमान बदलत आहे. खासकरून उत्तरेकडील थंड देशातून उष्णकटिबंधीय प्रदेशात येणार्‍या प्रवासी पक्ष्यांना तापमानवाढीची झळ बसली आहे. याचे कारण प्रवासी …


Neral-Matheran Mini Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! माथेरानच्या मिनी ट्रेनला वाफेच्या इंजिनाचा साज

Mumbai News : मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे. वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग एकत्र करून त्याची जोडणी नेरळमध्ये करण्यात येणार आहे.


Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्या रॅलीत घुसून तरुणाने मारली कानाखाली, VIDEO

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. पाचव्या टप्प्यात आता मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार हे प्रचार करत होते. यावेळी गर्दीमध्ये घुसून आलेल्या 2 तरुणाने कन्हैयाकुमार यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये नंदननगरी परिसरामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार प्रचार करत होते. आपल्या...


Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलं आहे. शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराजांकडून (Shantigiri Maharaj) नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शांतीगिरी महाराज प्रचारासाठी दररोज नवनवीन फंडे शोधत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून शांतिगिरी महाराजांनी आज भव्य प्रचार रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.


Hemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

Hemant Godse Nashik : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलंय.. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलंय. यावेळी शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या कटआऊटवर पृष्पवष्टी केलीय. यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजप आमच्यासोबतच असल्याचा विश्वास नाशिक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, हेमंत गोडसेंचं वक्तव्य. Shiv Sena Hemant Godse Nashik News भाजप हा महायुती मधील अधिकृत पक्ष आहे भाजप आमच्या सोबतच आहे शांतिगिरी महाराज यांनि काही वक्तव्य केले असले तरी त्यातुन गैरसमज निर्माण होऊ नये मोदींच्या फोटोवर पुष्पहार घातला याचा अर्थ त्याचा आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारालाच आहेत भुजबळ प्रचारात सक्रीय आहेत, त्यांचा पाठींबा मिळतोय आमचा विजय निश्चित आहे 100 टक्के विजयी होणार


PM Modi Convoy Shivaji Park : ठाकरे-फडणवीस-शिंदे मंचावर, Narendra Modi यांचा ताफा शिवाजीपार्कवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे शिवतिर्थ बंगल्यावर एकत्र दिसून आले. शिवाजी पार्क मैदानासमोर असलेल्या राज ठाकरेंच्या शिवतिर्थ बंगल्यावरील गॅलरीत तिन्ही नेते एकत्र संवाद साधताना पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. राज ठाकरेंच्या गॅलरीत तिन्ही नेते दिसले, तिघेही हास्यविनोद करताना पाहायला मिळाले. शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची भिवंडीत भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आणि आपचे खासदार संजय सिंह हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी शिवाजी पार्क येथे सभा घेत आहेत. मोदी सभा घेत असल्याचा आम्हाला आनंद असल्याची भावना महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केलीय. या सभेसाठी भाजपा व मनसे पदाधिकारी मुंबईतील शिवाजी पार्ककडे निघाल्याचे दिसून येते.


Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Air Force Recruitment 2024 Eligibility: भारतीय वायुसेनेत एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा आहेत.


Pune Metro: खूशखबर! पुणेकरांना 100 रूपयात करता येणार मेट्रोने प्रवास, उपलब्ध झालीये ही सुविधा

Pune Metro: पुणेकरांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मेट्रोने पुणेकरांसाठी दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दिवसभरात अवघ्या शंभर रुपयात मेट्रोने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिवसभरासाठी एकच शंभर रुपयाचा पास काढला तर तो दोन्ही मार्गांवर अमर्यादित प्रवासाची सुविधा त्यांना मिळणार आहे.


Wardha News : वर्ध्याच्या रसुलाबादमध्ये 70 ते 80 जनावरांना विषबाधा; प्रसंगावधान राखल्याने वाचले जनावरांचे जीव

Wardha News : वर्ध्यातील रसुलाबाद नजीक जंगल परिसर असल्याने येथील जंगलात काही जनावरे चराईसाठी गेली होती. दरम्यान, यातील गायी, म्हशी आदी जनावरांचा कळप जंगल परिसरात चरण्यासाठी गेला असता, त्यातील जवळपास 70 ते 80 जनावरांना विषबाधा (Poisoning)झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्वारीचे थोंब चारा खाल्ल्याने या चार्‍यातून ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक युवकांनी वेळीच धावपळ करत या सर्व जनावरांना रुग्णालयात दाखल...


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.